मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग वर ३२ तासांची वाहतूक कोंडी; १.२ लाख वाहनचालकांना टोल परतावा

0
78
Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय रा. माळकर

३ फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ गॅस टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तब्बल ३२ तास विस्कळीत झाली. आडोशी बोगद्याजवळ झालेल्या या अपघातानंतर २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांशिवाय रस्त्यावरच थांबावे लागले.

https://media.assettype.com/deccanherald%2F2025-05-01%2Fcntm9pfu%2FPTI09_10_2024_000103B.jpg?auto=format%2Ccompress&fit=max&w=undefined
प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने गॅस गळतीचा धोका निर्माण झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती, तर पुणे लेनमध्ये खालापूर टोल प्लाझापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. प्रशासनाने तब्बल ३२ तासांच्या प्रयत्नांनंतर टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली
https://images.indianexpress.com/2022/05/Pune-blast.jpg
या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र निर्देशानंतरही अनेक वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यातून टोल रक्कम कपात झाल्याचे समोर आले. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ने संबंधितांचा डेटा गोळा करून परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, टोल सवलतीबाबत IRB Infrastructure कडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. निर्देशानंतरही टोल वसुली सुरू का राहिली याबाबत स्पष्टीकरणही मागण्यात आले आहे. स्वयंचलित प्रणालीमुळे काही व्यवहार झाले असावेत, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टोल रक्कम परत करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने परतफेड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल, तसेच भविष्यात अशा परिस्थितीत अनावश्यक कपात टाळण्यासाठी तांत्रिक यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here