The Maharashtra Public Service Commission recently conducted the State Service 2024 examination. The results of this examination have been announced.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकतीच राज्यसेवा २०२४ ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये दीड हजारांवर विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेली आहे. मात्र, या परीक्षेमध्ये लागलेला कट ऑफ विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
आयोगाने स्पष्ट केले की, काही उमेदवारांना अर्ज सादर करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात विविध माध्यमांतून मागण्या प्राप्त झाल्या होत्या. आयोगाच्या माहितीनुसार, परीक्षा प्रवेशासाठी पात्र एकूण ७९७० उमेदवारांपैकी ७७३२ उमेदवारांनी अर्ज सादर केला होता, तर उर्वरित पात्र उमेदवारांनी मुदतीत अर्ज पूर्ण केले.
अर्ज सादरीकरणासंदर्भातील अडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी सुविधा केंद्र (हेल्पडेस्क) आणि आयोगाच्या कार्यालयाने उमेदवारांना मदत पुरवली. अर्ज करताना अडचणी आल्यास उमेदवारांनी ७३०३८२१८२२ किंवा ०२२६९१२३९१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर मदतीसाठी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.
त्यासोबतच आयोगाने स्पष्ट इशारा दिला की, विहित कालावधीत अर्ज सादर करणे आणि परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर कोणत्याही अर्ज किंवा शुल्क भरण्यासंदर्भातील विनंतीचा विचार करण्यात येणार नाही.
निकाल जाहीर – दीड हजारावर विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड
यावर्षीचा कटऑफ हा आजपर्यंतचा सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ओपन प्रवर्गासाठी ५०७.५० गुण, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४४७ गुण, आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ४१५ गुण इतका कटऑफ लागला आहे. स्पर्धा तीव्र झाली असून अनेक विद्यार्थ्यांनी या गुणांवर चिंता व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न, आयोगाची भूमिका
गेल्या काही दिवसांत अर्ज सादर करताना आलेल्या अडचणींविषयी विद्यार्थी विविध माध्यमांतून तक्रारी नोंदवत होते. परीक्षा पुढे ढकलावी किंवा अर्जासाठी अतिरिक्त वेळ द्यावा अशी मागणी केली जात होती. आयोगाने मात्र अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. तसेच अडचणी सोडवण्यासाठी हेल्पडेस्क सुविधा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
तज्ज्ञांचे मत आहे की, वाढलेल्या कटऑफमुळे स्पर्धेचे स्वरूप अधिक कठीण झाले आहे. अभ्यासातील काटेकोरपणा आणि गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया पार पडत असून विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यासाठी अधिक तयारी करावी लागणार आहे.