कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
बारावी परीक्षेच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत असल्याची माहिती पुणे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) ची लेखी परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती. परीक्षेचा निकाल दिनांक ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.निकालानंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यमंडळ स्तरावरून ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये या विद्यार्थ्यांना यातून बाहेर पडून पुढे काय करता येईल याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत असून यासाठी ही सेवा निशुल्क पध्दतीने सुरू केली आहे.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे-
९०११३०२९९७, ८२६३८७६८९६, ८७६७७५३०६९, ७३८७४००९७०, ९९६०६४४४१, ७२०८७७५११५, ८१६९२०२२१४, ९८३४०८४५९३, ८३२९२३००२२ व ९५५२९८२११५
-
कसे संपर्क साधावा : विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर किंवा त्यांच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधू शकतात.
-
हेल्पलाइन : विद्यार्थ्यांसाठी वरीलप्रमाणे समुपदेशकांचे भ्रमणध्वनी हेल्पलाइन नंबर म्हणून देखील उपलब्ध आहेत, जिथे ते थेट समुपदेशकाशी बोलू शकतात.
-
हेल्पलाइन नंबर: 1800-11-8004 (CBSE टेलि-समुपदेशन हेल्पलाइन).
-
मानसिक तणाव आणि नैराश्य: निकालानंतर काही विद्यार्थी नैराश्यात जातात. या सेवेद्वारे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि ते यातून बाहेर पडण्यास मदत करतील.
भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे.
————————————————————————————————-






