कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकूण ३,२६५ कोटी ३६ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. यापैकी २,५४६ कोटी ६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत, तर उर्वरित ७१९ कोटी २९ लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकूण ३,२६५ कोटी ३६ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. यापैकी २,५४६ कोटी ६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत, तर उर्वरित ७१९ कोटी २९ लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे.
या योजनेत यंदा फक्त एक रुपयात विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याअंतर्गत, स्थानिक नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांना २,५५२ कोटी ६० लाख रुपयांची तर हंगामातील प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७१२ कोटी ७५ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे.
लातूर विभागाला सर्वाधिक भरपाई –
लातूर विभागाला एकूण १,४०४ कोटी १२ लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली असून त्यात ६९१ कोटी ३६ लाख रुपये स्थानिक आपत्तींसाठी व ७१२ कोटी ७५ लाख रुपये हवामानाशी संबंधित नुकसानीसाठी आहेत. त्यापैकी बहुतेक रक्कम आधीच वितरित झाली आहे.
इतर प्रमुख विभागांतील भरपाईची स्थिती –
विभाग | मंजूर भरपाई (कोटी ) | वितरण (कोटी ) | शिल्लक (कोटी ) |
नाशिक | 149.88 | 102.72 | 47.15 |
पुणे | 282.99 | 133.55 | 169.44 |
कोल्हापूर | 15.49 | 9.67 | 5.82 |
नागपूर | 219.63 | 219 .28 | 0.35 |
छत्रपती संभाजीनगर | 564.18 | 404:11 | 160.07 |
लातूर 1 | 404.12 | 1263.35 | 140.76 |
अमरावती | 629.04 | 433.36 | 195.68 |
वितरित झालेली नुकसानभरपाई कशासाठी ?
कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत वितरित झालेल्या २,५४६ कोटी ६ लाख रुपयांपैकी १,८४४ कोटी ४४ लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७०१ कोटी ६२ लाख रुपये हंगामातील प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आले आहेत.
राज्यभरातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला असून, उर्वरित रक्कम लवकरच त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
—————————————————————————————-