कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज कोल्हापुरात ‘विजय संकल्प महासभा’ घेणार आहेत. आज दुपारी तीन वाजता दसरा चौक येथे ही जाहीर सभा घेणार आहेत. या सभेचे संयोजक आणि निमंत्रक वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे आहेत.
वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणूक लढवणारी राजकीय ताकद नसून, शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी चळवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगरपरिषदा, महानगरपालिका स्तरावर मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले आहे. वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आधारित, पारदर्शक आणि संघर्षशील राजकारणाचा पर्याय कोल्हापूरच्या मतदारांसमोर ठेवणार आहे. पक्षाच्या उमेदवारांची निवड ही सामाजिक प्रतिनिधित्व, कार्यक्षमता आणि स्थानिक प्रश्नांवरील लढाऊ भूमिका यावर आधारित असेल.
या अनुषंगाने आज दिनांक १७ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राज्य अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौक येथे जाहीर ‘विजयी संकल्प महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. या ‘विजयी संकल्प महासभेला’ वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या देशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर, प्रा, मा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते मा. सुजात आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा प्रभारी मा. डॉ. क्रांती सावंत, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. सोमनाथ साळुंखे, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. सिध्दार्थ मोकले, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. इम्तियाज नदाफ, जिल्हा अध्यक्ष, कोल्हापूर दक्षिण मा. श्री बाबूराव आयवाळे, कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर उत्तर मा. जनार्दन गायकवाड, जिल्हाध्यक्ष दक्षिण मा. बाबुराव आयवाळे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून येणारे वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थितराहणार आहेत






