मॉडेल सौर ग्राम स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ६३ गावांची निवड

विजेत्या गावाला १ कोटी रुपयांचे केंद्राचे अनुदान

0
139
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. यानिमित्त केंद्र सरकारने ‘मॉडेल सौर ग्राम स्पर्धा’ आयोजित केली असून, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील ६३ गावांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या विस्ताराचा भाग असून, ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनविणे आहे. यासाठी निवड झालेल्या गावांनी सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमतेची निर्मिती करावी लागणार आहे. विजेते ठरणाऱ्या गावाला १ कोटी रुपयांचे केंद्र पुरस्कृत अनुदान दिले जाणार असून, इतर गावांनाही ऊर्जा साक्षरतेचा मोठा लाभ मिळणार आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांमध्ये सार्वजनिक पथदिवे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत इमारती, शाळा व आरोग्य केंद्रांसाठी सौर ऊर्जा वापरण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे गावांचे विजेवरील खर्च कमी होतील आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल.
या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील निवडलेली गावे ‘मॉडेल सौर ग्राम’ म्हणून ओळखली जाण्याची संधी मिळवू शकतील. सौर ऊर्जेच्या वापराचे उत्तम उदाहरण उभे करताना ही गावे इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतील, असा विश्वास ऊर्जा मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

स्पर्धेचा कालावधी : ६ महिने

विजेत्या गावाला बक्षीस : ₹ १ कोटी केंद्र पुरस्कृत अनुदान

मुख्य निकष : सर्वाधिक सौर ऊर्जा निर्मिती आणि वापर

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये ऊर्जा साक्षरता, स्वयंपूर्णता आणि पर्यावरण सजगता यांची बीजे रुजतील, अशी अपेक्षा आहे.


Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here