Kolhapur residents continue to provide assistance to the Congress Committee in response to the appeal for help for flood victims in Marathwada.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूरकरांचा दातृत्वाचा हात सुरूच आहे. काहींनी तर, शैक्षणिक साहित्याची मदत देखील जिल्हा काँग्रेस कमिटीत आणून दिली आहे. तर काहींनी ऑन लाईन जीवनावश्यक वस्तूं याठिकाणी पोहच केल्या आहेत. अगदी हातावरचे पोट असणाऱ्या लोकांनी देखील आपल्या परीने पूरग्रस्तांच्या साठी मदत दिली आहे.
कुणी धान्य देतंय, तर कोण रोजच्या वापरातील वस्तू, तर कोणी साबणाचे किट, कपडे अन् शैक्षणिक साहित्य. अशा स्वरूपात मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या करिता मदत सुरूच आहे. अनेकांनी जीवनावश्यक वस्तू, आणि साहित्य पूरग्रस्तांच्या करिता जमा केले. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी, त्यांच्या रोजच्या खाऊच्या पैशातून देखील याठिकाणी मदत दिली. अनेकांनी दातृत्वाची जागा घेतल्याने महापुराच्या संकटात सापडलेल्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.
माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी, २४ सप्टेंबर पासून मदत संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे. आता पर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे १५०० हून अधिक किट जमा झाल्याचे सांगितले. त्यामध्ये तांदूळ, साखर, गहू, आटा मसुर डाळ, तूरडाळ, मूगडाळ, चहा पावडर, चटणी, मीठ मसाले आणि खाद्यतेलाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तर ४ हजार किलो हून अधिक तांदूळ, २ हजार किलो हून अधिक गहू, साबुदाणा, साखर, चटणी, तूरडाळ, बिस्किट, पाण्याच्या बॉटल अशा वस्तू देखील जमा झाल्या आहेत. ही मदत येत्या २९ सप्टेंबरला महापूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी २८ सप्टेंबर हा मदत जमा करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, प्रताप जाधव सरकार, मधुकर रामाणे, शशिकांत खोत, बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, कैलास गोडदाब, सुभाष बुचडे, महेश जाधव, धीरज पाटील, नारायण गाडगीळ, संग्राम पाटील, संजय पोवार – वाईकर, विद्यानंद पोळ, आदी उपस्थित होती.