प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (BLA) कडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशातच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत दिलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानी लष्कराची वास्तविक स्थिती समोर आली असून, लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची डोकेदुखी वाढल्याचे मानले जात आहे.
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) चे ‘ऑपरेशन हेरोफ 2.0’
बलुच लिबरेशन आर्मीने ‘ऑपरेशन हेरोफ 2.0’ अंतर्गत बलुचिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले.
या हल्ल्यांमध्ये 17 सुरक्षा जवान आणि 33 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत 177 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे.
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) कडे अत्याधुनिक शस्त्रसाठा
संसदेत बोलताना ख्वाजा आसिफ यांनी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) च्या शस्त्रसज्जतेबाबत धक्कादायक माहिती दिली.
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) कडे 20 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेली आधुनिक पिस्तुले आहेत, अशी शस्त्रे पाकिस्तानी लष्कराकडे उपलब्ध नाहीत, असे त्यांनी मान्य केले.
तसेच, 4 ते 5 हजार डॉलर्स किंमतीचे थर्मल वेपन साईट्स आणि लेझर सिस्टीम्स बलुच लिबरेशन आर्मी (BLA) सदस्यांकडे असून, त्याच्या मदतीने ते रात्रीही अचूक हल्ले करू शकतात.
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिक हतबल
ख्वाजा आसिफ यांनी बलुचिस्तानची भौगोलिक परिस्थिती पाकिस्तानी लष्करासाठी मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट केले.
एखादे मोठे शहर सांभाळण्यापेक्षा संपूर्ण बलुचिस्तानवर नजर ठेवणे अधिक कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
सैनिक प्रयत्नशील असले तरी एवढ्या विशाल आणि दुर्गम प्रदेशात प्रभावी गस्त घालणे त्यांच्या क्षमतेबाहेर असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले.
पाकिस्तानी लष्कराचा ‘खरा चेहरा’ उघड
आसिफ यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान कायम करत असलेले “जशास तसे उत्तर देऊ” हे दावे कमकुवत ठरत आहेत.
सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यानेच लष्कराच्या मर्यादा उघड केल्याने, पाकिस्तानच्या संरक्षण क्षमतेवर आणि अधिकृत दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.






