मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकतीच राज्यसेवा २०२४ ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये दीड हजारांवर विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेली आहे. मात्र, या परीक्षेमध्ये लागलेला कट ऑफ विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.