spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगभारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

२५ कोटींपेक्षा अधिक कामगारांचा सहभाग

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

देशातील प्रमुख कामगार संघटनांच्या संयुक्त आवाहनावरून आज ‘भारत बंद’ पुकारण्यात आला असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अंदाजे २५ कोटींपेक्षा अधिक कामगारांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. 

 संपाची हाक १० केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने दिली असून, शेतकरी संघटना आणि ग्रामीण कामगार संघटनांनीही त्यास आपला पाठिंबा दर्शविला आहे. परिणामी, विविध क्षेत्रांमध्ये कामकाज ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.

अत्यावश्यक सेवांवर परिणाम

या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, राज्य परिवहन, औद्योगिक उत्पादन आणि वीजपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवा क्षेत्रांवर झाला आहे. देशातील अनेक राज्यांत सार्वजनिक वाहतूक सेवेवर परिणाम झाल्याने सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

व्यापारी संघटनांचा विरोधाभासी दृष्टिकोन

दुसरीकडे, काही व्यापारी संघटनांनी मात्र असा दावा केला आहे की, या भारत बंदमुळे लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही. शहरांमध्ये अनेक दुकानं व व्यवसाय सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारकडून शांततेचे आवाहन

दरम्यान, केंद्र सरकारकडून बंददरम्यान शांतता व कायदा-सुव्यवस्थेच्या पालनाचे आवाहन करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

या बंदामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता असून, कामगार संघटना व शेतकरी संघटनांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत सरकार व संघटनांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

——————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments