सिंधुदुर्ग : प्रसारमाध्यम न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टीचे प्रतीक असलेला सिंधुदुर्ग किल्ला आता जागतिक पातळीवर गौरवला गेला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला असून, हा क्षण महाराष्ट्रासाठी तसेच संपूर्ण भारतासाठी अत्यंत गौरवास्पद ठरला आहे.
११ जुलै २०२५ रोजी पॅरिसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या ४७ व्या जागतिक वारसा समितीच्या सत्रात, ‘Maratha Military Landscapes of India’ या शीर्षकाखाली सिंधुदुर्गसह शिवरायांच्या एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल करण्यात आला.
या यादीत समाविष्ट किल्ले पुढीलप्रमाणे – सिंधुदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी ( तमिळनाडूमधील )
या ऐतिहासिक निर्णयामुळे शिवप्रेमींसह इतिहास आणि वारसा जपणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे सामरिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व आता जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे.
युनेस्कोच्या या घोषणेमुळे या किल्ल्यांचे संवर्धन, जतन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्याच्या दृष्टीने मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात या स्थळांना पर्यटन, अभ्यास आणि संशोधनाच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
या ऐतिहासिक घोषणेमुळे महाराष्ट्रातील वारसास्थळांबाबत जनजागृती वाढणार असून, शिवकालीन किल्ल्यांच्या महत्त्वाचे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
मुख्य ठळक बाबी
-
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा साम्राज्याचे १२ किल्ले.
-
११ जुलै २०२५ रोजी पॅरिस येथे घोषणा.
-
‘Maratha Military Landscapes of India’ अंतर्गत समावेश.
-
महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि स्थापत्य परंपरेला आंतरराष्ट्रीय मान्यता.
————————————————————————————————–