कीटकनाशकामुळे होणारे आजार टाळण्यासाठी सीडसाद्वारे संशोधन; राज्यात सहा केंद्र उभारणार

0
91
Pune International Agriculture Hackathon inaugurated by Deputy Chief Minister Ajit Pawar
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कीटकनाशक वापरामुळे होणारे आजार टाळण्यासाठी कृषी विद्यापीठातील प्रयोगशाळा अत्याधुनिक केली जाईल यासाठी कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी बेंगळुरू येथील ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हल्पमेंट इन स्मार्ट ॲग्रीकल्चर’ (सीडसा) या कंपनीच्या मदतीने राज्यात नाशिकसह सहा विभागांमध्ये प्रत्येकी एक सीडसा केंद्र उभारण्यात येतील,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन’चे उद्‍घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण विभागात सीडसाचे केंद्र सुरू केले जातील. त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. कीटकनाशक वापरलेल्या शेतमालामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या कीटकनाशकांची तपासणी करण्याच्या दृष्टीने विद्यापीठातील प्रयोगशाळेला पशुसंवर्धन प्रयोगशाळेप्रमाणे अत्याधुनिक स्वरूप देण्यात येईल,’ असे पवार यांनी सांगितले.

 

आमदार बाबाजी काळे, चेतन तुपे, बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, ‘कृषी क्षेत्रात मनुष्यबळाअभावी अडचणी निर्माण होणार आहेत, हा धोका ओळखून कर्नाटकातील ४० आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी एकत्र येऊन, कृषी क्षेत्रातील मानव विरहित अवजारे आणि तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. यामध्ये मानवरहित ट्रॅक्टर, मानवरहित ड्रोन विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या सर्व तंत्रज्ञानाच्या वापरातून महाराष्ट्रातील शेती संरक्षित, सुरक्षित आणि शाश्वत करण्याचे धोरण आहे. यासाठी या कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून नवनवीन संशोधन शेतीमध्ये येईल.’ मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महानंद माने यांनी आभार मानले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here