Today, 8 Memorandums of Understanding (MoUs) and 2 strategic agreements were signed in the presence of Chief Minister Fadnavis in the committee room of the Ministry.
मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र “ डेटा सेंटर कॅपिटल ” आणि “ सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल ” बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून उत्पादन क्षेत्र, लॉजिस्टिक आणि वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील गुंतवणूकदारांचा विश्वास आणि राज्य सरकारची औद्योगिक धोरणे यामुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, “गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत व्हावी यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत काम करेल. याशिवाय हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळाली आहे. आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प पुन्हा पुढे सरकत आहे. हा प्रकल्प लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवेल.”
आज मंत्रालयातील समिती कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ८ सामंजस्य करार (MoUs) आणि २ रणनीतिक करार झाले. या करारांमधून राज्यात तब्बल ४२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २८ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर – महाराष्ट्रात यूके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सहकार्य.
टीयूटीआर हायपरलूप प्रा. लि. – जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारणीसाठी करार.
या करारांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक, ऊर्जा, लॉजिस्टिक आणि वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व विकासाची नवी दारे उघडणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.