spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeक्रीडाआशिया कप हॉकीत भारताची विजयी सुरुवात

आशिया कप हॉकीत भारताची विजयी सुरुवात

चीनवर 4-3 ने मात, हरमनप्रीतची हॅटट्रिक ठरली निर्णायक

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. बिहार मधील राजगीर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने चीनचा  ४-३ असा पराभव केला. भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग हा चमकदार ठरला. त्याने हॅट्ट्रिक नोंदवत एकट्याने ३ गोल केले, तर चौथा गोल करून भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली.
सामन्यात सुरुवाती पासूनच चुरस पाहायला मिळाली. तिसऱ्या क्वार्टरअखेर दोन्ही संघांचा स्कोअर ३-३ अशी बरोबरीत होता. मात्र, शेवटच्या आणि निर्णायक चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने उत्कृष्ट बचावासह आक्रमक खेळ दाखवला. त्याचा फायदा घेत भारताने ४-३ अशी आघाडी घेतली आणि अखेरच्या मिनिटांपर्यंत ती कायम ठेवत विजय निश्चित केला.
या विजयासह भारताने आशिया कप मोहिमेची दमदार सुरुवात केली असून, आगामी सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
सामन्याचा आढावा
  • पहिला क्वार्टर : सामन्याची सुरुवात चीनने जोरदार केली. १२ व्या मिनिटाला डू झिनहाओने गोल करून चीनला १-० आघाडी मिळवून दिली. पहिला क्वार्टर संपताना भारत पिछाडीवर होता.
  • दुसरा क्वार्टर : भारताने शानदार पुनरागमन केले. १८ व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून स्कोअर १-१ केला. त्यानंतर केवळ एका मिनिटाने हरमनप्रीत सिंगने गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हाफटाईमला भारत आघाडीवर गेला.
  • तिसरा क्वार्टर : ३३ व्या मिनिटाला हरमनप्रीतने पुन्हा गोल करून भारताला ३-१ अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. परंतु चीनने जोरदार खेळ करत चेन बेनहाई ( ३५ वे मिनिट ) आणि गाओ जिशेंग ( ४२ वे मिनिट ) यांच्या गोलच्या जोरावर सामना ३-३ असा बरोबरीत आणला.
  • चौथा क्वार्टर : ४७ व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली आणि भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत भारताने ही आघाडी टिकवून ठेवत विजय निश्चित केला.
गोल करणारे खेळाडू
  • भारताकडून : हरमनप्रीत सिंग ( २० वे, ३३ वे, ४७ वे मिनिट – पेनल्टी कॉर्नर), जुगराज सिंग (१८ वे मिनिट).
  • चीनकडून : डू झिनहाओ ( १२ वे मिनिट ), चेन बेनहाई ( ३५ वे मिनिट ), गाओ जिशेंग ( ४२ वे मिनिट).
स्पर्धेचे महत्त्व
ही आशिया कप स्पर्धा विशेष आहे कारण विजेता संघ थेट पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना निर्णायक ठरणार आहे. तीन वेळचा विजेता भारत आणि चीन पूल ए मध्ये असून त्यांच्यासोबत जपान आणि कझाकस्तान आहेत. पूल बी मध्ये पाच वेळची विजेती दक्षिण कोरिया, मलेशिया, बांगलादेश आणि तैवान आहेत.
कझाकस्तान संघ तीन दशकांनंतर प्रथमच आशिया कप खेळत आहे, तर पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतल्याने त्यांच्या जागी बांगलादेश सहभागी झाला आहे. प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. स्पर्धेचा अंतिम सामना ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments