नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या व्यापार क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. १ ऑक्टोबर पासून भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) मधील चार देश – आयसलंड, लिचेस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांच्यात मुक्त व्यापार करार (FTA) अंमलात येणार आहे. युरोपातील कोणत्याही गटाशी भारताने असा करार प्रथमच केला आहे.
करारातील प्रमुख मुद्दे
-
या चार देशांतून येणाऱ्या ८०-८५% वस्तूंवर भारतात शून्य टक्के आयात शुल्क असेल.
-
भारतातून या देशांमध्ये जाणाऱ्या ९९% वस्तूंवर शून्य शुल्क आकारले जाईल.
-
पहिल्या १० वर्षांत अंदाजे ५० अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित आहे, त्यानंतरच्या पाच वर्षांत आणखी ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल.
-
या करारामुळे अंदाजे १० लाख रोजगार थेट उपलब्ध होतील.
कराराचे फायदे