spot_img
सोमवार, ऑक्टोबर 13, 2025

9049065657

Homeशासकीय योजनादिवाळीसाठी एस.टी.च्या ९०२ ज्यादा बसेस

दिवाळीसाठी एस.टी.च्या ९०२ ज्यादा बसेस

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

यंदाच्या दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने -एस.टी. विभागाने  राज्यभरात ९०२ जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या सणासुदीच्या आनंदात भर पडणार आहे. या विशेष बससेवेमुळे प्रवासी आपल्या गावी वेळेत पोहोचून सणांचा आनंद घेऊ शकतील. महामंडळाच्या या नियोजनामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

ही विशेष सेवा राज्यातील सहा प्रमुख विभागांमध्ये कार्यान्वित केली जाणार असून, विविध जिल्ह्यांमधून गावी जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक मोठी सुविधा ठरणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात एस.टी. बसस्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीच्या सणाला मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकसह राज्याच्या विविध भागांत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना वेळेत प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. या जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांची गर्दी व्यवस्थित हाताळली जाणार असून, महामंडळाला आर्थिक लाभही होणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा राबवली. या काळात १५ हजार ३८८ फेऱ्यांमधून ५ लाख ९६ हजारांहून अधिक प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाचा आनंद घेतला. या विशेष सेवेतून महामंडळाला २३ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल मिळाला, ज्यामुळे महामंडळाने अपघातविरहित आणि सुरक्षित वाहतुकीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments