मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
यावर्षी नवरात्राचा उत्सव विशेष ठरणार आहे. श्राद्धकाळ कमी झाल्यामुळे आणि तिथींच्या संयोगामुळे नवरात्र १० दिवसांचे साजरे होणार असून, हा सर्वांसाठी लाभाचा आणि शुभ मानला जात आहे. भक्तांमध्ये उत्साह असून देवीचे आगमन हत्तीवरून होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हत्तीवर स्वार होऊन देवीचे आगमन झाले तर ते सुख, समृद्धी आणि शुभ फलदायी असल्याचे मानले जाते.