पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गेल्या काही महिन्यांपासून देशाला भिजवणारा नैऋत्य मान्सून आता हळूहळू माघारी फिरत असला तरी त्याचा प्रभाव अनेक राज्यांमध्ये कायम असून पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सून माघार घेत असला तरी इतर भागांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानाचा धोका कायम आहे.