मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सिंचन व पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ‘मागेल त्याला विहीर’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ( मनरेगा ) या योजनेची अंमलबजावणी केली जात असून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. जमिनीचे क्षेत्रफळ, विहिरीचा प्रकार, परिसरातील पाण्याची उपलब्धता आणि जलसंधारणाच्या परिस्थितीवर आधारित हे अनुदान ठरवले जाईल.
योजनेमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
-
विहिरीमुळे शेतकरी बागायती पिके घेऊ शकतील, उत्पादनात वाढ होऊन उत्पन्नात भर पडेल.
-
राज्यातील अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.
-
सिंचनासाठी स्थिर पाण्याचा स्त्रोत मिळाल्याने शेतजमीन टिकून राहील, तसेच रोजगाराच्या संधी वाढतील.
-
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटेल.
-
शेतकरी आत्मनिर्भर बनून शेतीकडे आकर्षित होतील.
पात्रता व अटी
-
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि शेतकरी असावा.
-
किमान ०.४० हेक्टर शेती असणे आवश्यक.
-
अर्जदाराच्या शेतात आधीपासून विहीर नसावी.
-
अर्जदार मनरेगा जॉब कार्डधारक असणे आवश्यक.
-
लाभार्थीचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
-
प्रस्तावित जागेपासून ५०० मीटरच्या परिसरात दुसरी विहीर नसावी.
-
याआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.