कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्हा रेशीम कार्यालयाकडून रेशीम विभाग आपल्या दारी मोहीम १ सप्टेंबर २०२५ पासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे ५०० रु. प्रति एकर याप्रमाणे नोंदणी केली होती. परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद्योग सुरु केला नाही अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक व रेशीम उद्योग सुरु करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तुती लागवड का केली नाही याबाबत अभिप्रायही घेण्यात येणार आहे.