मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. असे असताना राज्य सरकारकडे निधीच उपलब्ध नाही. परिणामी, केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. या आर्थिक टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) निधीतून आपत्कालीन उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.