पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा तडाखा अद्याप ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
३० सप्टेंबर – आज (सोमवार) राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नाही. फक्त नांदेड जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१ ऑक्टोबर – उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून
-
कोकण-मध्य महाराष्ट्र : रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट
-
विदर्भ : बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट
२ ऑक्टोबर
-
मराठवाडा : हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता, उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता.
-
विदर्भ : अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट.
-
कोकण-मध्य महाराष्ट्र : रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट.
३ ऑक्टोबर
-
विदर्भ : संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट.
-
मराठवाडा : बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा.
-
कोकण-मध्य महाराष्ट्र : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट.
-
राज्यातील इतर बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता.