spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeराजकीयजगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : प्रतिनिधी न्यूज

जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार झाला आहे. या पुलामुळे काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. १३० वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवून या पुलाचे उद्घाटन केले. २७२ किमी लांबीचा उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग देशाला समर्पित केला. चिनाब पुलाच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या, तरी २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे स्वप्न साकार झाले आहे.

चिनाब नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंच असलेला हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. या पुलामुळे काश्मीरच्या बर्फाळ वाऱ्यांचा आनंद घेता येणार आहे. चिनाब पूल प्रकल्पाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. अनेक अडचणींमुळे २००९ पर्यंत केवळ मूलभूत कामेच पूर्ण झाली. २०१७ मध्ये ३२०० कर्मचारी आणि अभियंत्यांनी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. २०२१ मध्ये पुलाच्या आर्कचे काम सुरू झाले आणि रूळ टाकण्यात आले. सुमारे २२ वर्षांनंतर, आज ६ जून रोजी या पुलावरून रेल्वेगाडी धावणार आहे.

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक २७२ किमीचा आहे. या रेल्वे मार्गावर ३६ बोगदे आहेत, ज्यांची लांबी ११९ किमी आहे. रेल्वे मार्गावर ९४३ रेल्वे पूल आहेत. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंच आहे. हा पूल -१० डिग्री सेल्सियस ते ४० डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान सहन करू शकतो. या पुलाची क्षमता १२० वर्षांपर्यंत आहे. ४० किलोपर्यंतच्या टीएनटी स्फोटकांचाही या पुलावर काही परिणाम होणार नाही. ८.० तीव्रतेच्या भूकंपाने देखील या पुलाला कोणताही धोका होणार नाही. २६० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वादळ देखील या पुलाचे नुकसान करू शकणार नाही. पुलाचा प्रत्येक भाग ६३ मिलीमीटरच्या ब्लास्ट-प्रूफ स्टीलने बनवलेला आहे.

इंजिनीअरिंग मार्बल

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू आणि श्रीनगर रेल्वे मार्गावर बनलेल्या चिनाब ब्रिजला एक इंजिनीअरिंग मार्बल म्हटले आहे. या पुलाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, “याचे डिझाइन खूप किचकट आहे आणि त्याचे फाउंडेशन अर्ध्या फुटबॉल मैदानाएवढे आहे आणि त्यात ३० हजार टन स्टील लागले आहे. तसेच, ते म्हणाले की हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे.”
 
काश्मीरच्या विकासाची गाथा लिहिणाऱ्या या पुलावरून आजपासून रेल्वे सेवा सुरू झाली आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेला हा चिनाब पूल दोन टोके कौडी आणि बक्कल गावाला जोडतो. हा पूल बनवण्याचे काम एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने केले आहे. या प्रकल्पात व्हीएसएल इंडिया आणि दक्षिण कोरियाची अल्ट्रा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग कंपनी देखील सामील आहे. कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने उत्तर रेल्वेच्या वतीने या संपूर्ण प्रकल्पाची देखरेख केली. चिनाब पुलाचे डिझाइन फिनलंडच्या डब्ल्यूएसपी ग्रुप आणि जर्मनीच्या लिओनहार्ड्ट एंड्रा एंड पार्टनरने पूर्ण केले. या पुलाला ब्लास्ट प्रूफ बनवण्याचे श्रेय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला जाते.
——————————————————————————————–
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments