कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शारदीय नवरात्रोत्सवाला कोल्हापुरात भाविकांच्या जल्लोषात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी तब्बल सव्वा लाख भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देशभरातून आलेल्या भक्तांनी देवीच्या चरणी लीन होऊन नवरात्राची सुरुवात मंगलमय केली.
सोमवारी घरोघरी घटस्थापना असल्याने सकाळी मंदिर परिसर तुलनेने शांत होता; मात्र दुपारनंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा फुलू लागल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आकडेवारीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत १ लाख १८ हजार ४१७ भाविकांनी दर्शन घेतले होते, तर त्यानंतरही रांगांचा ओघ अखंड सुरू होता.
