मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
डिजिटल व्यवहार आणि ई-गव्हर्नन्समध्ये नवे पर्व सुरू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI ) एकत्रितपणे दोन महत्त्वाचे उपक्रम राबवत आहेत. यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन सोपे होईल, सरकारी सेवा सुलभ होतील आणि सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम बनेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.