Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

भारतातील नागरी पुरस्कार हे व्यक्तीने विविध क्षेत्रांत केलेल्या अतुलनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दिले जातात. या पुरस्कारांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात: भारतरत्न (सर्वोच्च) आणि पद्म पुरस्कार (विभूषण, भूषण,  पद्मश्री).

या पुरस्कारांचे अधिकृत स्वरूप आणि मिळणाऱ्या सवलतींची सविस्तरपणे आपण माहिती घेणार आहेत 

भारतरत्न – सर्वोच्च नागरी सन्मान

  • हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, क्रीडा आदी क्षेत्रांतील अत्युच्च कामगिरीसाठी दिला जातो.
  • पुरस्काराचे स्वरूप: राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र
  • पिंपळाच्या पानाच्या आकाराचे कांस्य पदक (प्लॅटिनम सूर्यचिन्हासह)
  • मानधन: कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही
  • विशेष सवलती: भारत सरकारचे राज्य अतिथी (State Guest) म्हणून मान
  • एअर इंडियात एक्झिक्युटिव्ह क्लास आणि रेल्वेमध्ये प्रथम श्रेणी मोफत प्रवास

 

पद्म पुरस्कार (Padma Awards)

पुरस्काराचे नाव    दर्जा  कशासाठी दिला जातो
पद्मविभूषण    दुसरा    असाधारण आणि विशिष्ट सेवा
पद्मभूषण   तिसरा  उच्च दर्जाची विशिष्ट सेवा
पद्मश्री    चौथा  कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा

 

  • मानधन: केंद्र सरकारकडून कोणतीही रोख रक्कम नाही
  • सवलती: रेल्वे/विमान प्रवास मोफत नाही

राज्य सरकारे इच्छेनुसार काही लाभ देऊ शकतात सर्व नागरी पुरस्कारांसाठी समान नियम पदवी म्हणून वापरास बंदी

भारतीय राज्यघटनेच्या कलम 18(1) मध्ये असे म्हटले आहे : “राज्य कोणत्याही व्यक्तीला, मग ती नागरिक असो किंवा गैर-नागरिक असो, कोणतीही पदवी बहाल करणार नाही.” या तरतुदीचा उद्देश सरकारद्वारे पदव्या प्रदान करून कोणतीही औपचारिक पदानुक्रम किंवा विशेषाधिकार प्राप्त वर्गाची स्थापना रोखणे हा आहे.

 

दरवर्षी १ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान नामांकन प्रक्रिया

नावे २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला जाहीर करतात 

भारताचे राष्ट्रपती राष्ट्रीय पुरस्कार (नागरी किंवा शौर्य) खालील परिस्थितीत काढून घेऊ शकतात: 
  • गुन्हेगारी गैरवर्तन: पुरस्कारप्राप्त व्यक्तीने कोणताही मोठा गुन्हा केला असल्यास.
  • गैरवापर: पुरस्काराचा किंवा सन्मानाचा गैरवापर केल्यास.
  • राष्ट्रविरोधी कृती: देशाच्या विरोधात कोणतीही कृती केल्यास.
  • पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीच्या नैतिक अधपतनामुळे किंवा देशद्रोही कृतीमुळे राष्ट्रपतींच्या मान्यतेने पुरस्काराचे वितरण रद्द करून तो परत घेतला जाऊ शकतो. 

पद्म पुरस्कार हा सन्मान आहे, सुविधा किंवा आर्थिक पॅकेज नाही.
देशासाठी, समाजासाठी आणि संस्कृतीसाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे.

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (awards.gov.in) हे भारत सरकारचे एकच, पारदर्शक व्यासपीठ आहे, जिथे सर्व मंत्रालयांचे राष्ट्रीय पुरस्कार, नामांकन आणि अर्ज ऑनलाइन जमा केले जातात। हे पोर्टल नागरिकांना किंवा संस्थांना विविध पुरस्कारांसाठी स्वतःचे नाव किंवा इतरांचे नामांकन (self-nomination) करण्याची सुविधा देते। 

या लिंक वर क्लिक करून आपण पुरस्कारासाठी अर्ज करू शकता.

https://awards.gov.in/Registration/SignUp

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here