spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeशिक्षणदहावीत ३८ हजाराहून अधिक मराठीत नापास

दहावीत ३८ हजाराहून अधिक मराठीत नापास

इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयांमध्ये सहा पटीनं जास्त नापास

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत राज्यातील ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालचा आनंद व्यक्त होतोय मात्र हाच निकाल आपल्यासाठी लाजिरवाणा आणि धक्कादायक आहे. आपली मातृभाषा मराठी आहे, जिला अभिजात दर्जा मिळाला म्हणून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला त्याच मराठीत दहावीत महाराष्ट्रातले तब्बल ३८ हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. 

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रातले विद्यार्थी खरंच मराठी शिकतायेत का, असा प्रश्न पडलाय आणि त्याचं कारण म्हणजे नुकताच लागलेला दहावीचा निकाल. या निकालात राज्यात मराठी विषयात तब्बल ३८  हजार ४३७  विद्यार्थी नापास झालेत. मुंबई विभागात तब्बल ४ हजार मुलं मराठीत नापास झाली आहेत तर मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये तब्बल  १५ हजार ११७  विद्यार्थी नापास झालेत. मराठी विषयात नापास होण्यामागे अनेक कारणं राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितली आहेत.  त्यामुळे ही स्थिती सुधारून निकाल चांगला यावा यासाठी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयावर लक्ष द्यावं लागेल, असं लातूर मंडळाचे अध्यक्ष सांगत आहेत.

इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण जातंय, हे दुर्दैवी आहे. इंग्रजीपेक्षा मराठी अवघड, ३८ हजार ४३७ विद्यार्थी नापास तर इंग्रजीत ६ हजार ७३८ विद्यार्थी नापास झाले आहेत.  इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयांमध्ये नापास होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी सहा पटीनं जास्त आहे. अनेक घरांमध्ये मराठीला दुय्यम मानतात, पालक मराठीत बोलत नाहीत परिणामी मराठी कठीण बनल्याचं भाषातज्ञ सांगतात. जागतिक भाषा इंग्रजी, पुढचं शिक्षणही इंग्रजीत मग मराठी शिकून फायदा तो काय, या विचारानं ही स्थिती असंही मत भाषातज्ञांकडून व्यक्त

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर असावा, असं धोरण असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातच मातृभाषेकडं दुर्लक्ष होतंय हे गंभीर चित्र आहे. मातृभाषेतून एखाद्या विषयाचं आकलन सहज होतं पण तीच येत नाही मग करायचं काय? मातृभाषेतच विद्यार्थी जर नापास होत असतील तर याला जबाबदार कोण? हे प्रश्न आहेत. मराठीचे ढोल पिटणाऱ्या राजकारण्यांनी आणि सर्व स्तरातल्या नागरिकांनी आता धोक्याची घंटा समजावी आणि मराठीकडे तातडीनं लक्ष द्यावं, अन्यथा येता काळ फार कठीण असेल. 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments