spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeहवामानमान्सून लवकर परतण्याची शक्यता

मान्सून लवकर परतण्याची शक्यता

यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( आयएमडी ) दिलेल्या माहितीनुसार यंदा नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १५ सप्टेंबरच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थानच्या काही भागांत मान्सून परतीस अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला असून २०२० नंतर प्रथमच तो सर्वसाधारण ८ जुलैच्या आधी ९ दिवस लवकर देशभर पसरला. २४ मे रोजी केरळमध्ये मान्सूनने वर्दी दिली आणि २६ जून रोजी संपूर्ण भारत व्यापला. यापूर्वी २००९ मध्ये २३ मे रोजी मान्सून दाखल झाला होता.

हंगामाच्या पावसाचा आढावा घेतल्यास, आतापर्यंत देशात ८३६.२ मिमी पाऊस झाला असून तो ७७८.६ मिमी या सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक आहे. विशेषतः उत्तर-पश्चिम भारतात सरासरी ५३८.१ मिमीच्या तुलनेत ३४ टक्के अधिक, म्हणजेच ७२०.४ मिमी पाऊस झाला आहे. हवामानशास्त्र विभागानुसार, गेल्या ५० वर्षांतील सरासरी पाऊस हा सामान्य पावसाचा मापदंड मानला जातो आणि त्याच्या तुलनेत यंदाचा पाऊस लक्षणीय अधिक आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता, पुढील काही दिवस काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. शेती, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना हवामानाची नियमित माहिती देत तयारी सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदाच्या पावसामुळे अनेक भागांत पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असले तरी परतीच्या टप्प्यावर हवामानाचा योग्य अंदाज घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

————————————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments