कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
अॅपल कंपनी आता जगभरात विकणाऱ्या दर पाच आयफोन पैकी एक आयफोनची भारतात निर्मिती करीत आहे. सरकार देखील ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात या फोनची मॅन्युफॅक्चरिंग वाढवत आहे.
अमेरिकेची दिग्गज कंपनी Apple ने भारतात आयफोन असेंबल करण्यात मोठी गरुड भरारी घेतली आहे. चीनला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेने चीनमधून अॅपल असेंबलिंग करण्याचा उद्योग भारतात हलविल्यानंतर हा प्रकार घडला आहे. गेल्यावर्षी अॅपलने सुमारे २२ अब्ज डॉलरचे ( १.२ कोटी रुपये ) आयफोन्स तयार केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. अॅपल आता चीनच्या बाहेर अॅपलचे उत्पादन करीत आहे आणि भारत आता अॅपल फोन उत्पादनात ग्लोबल हब झाला आहे.
२० टक्के उत्पादन आता भारतात
अॅपल कंपनी आता जगभरात विकणाऱ्या दर ५ आयफोन पैकी १ आयफोनची भारतात निर्मिती करीत आहे. म्हणजे आयफोनचे २० टक्के उत्पादन आता भारतात होत आहे. सरकार देखील ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात या फोनची मॅन्युफॅक्चरिंग वाढवत आहे.
चीन नव्हे भारत बनला हब
Apple आणि त्याचे पुरवठादार फॉक्सकॉन, विस्ट्रॉन (आता टाटाकडे ) आणि पेगाट्रॉन हे सर्वच जण आता चीनऐवजी भारतात आयफोनची मॅन्युफॅक्चरिंग करण्यात रस घेत आहेत. त्यामुळे आयफोनचे प्रोडक्शन वेगाने होत आहे. कोविड-१९ मध्ये लॉकडाऊनमुळे Apple च्या सर्वात मोठ्या फॅक्टरीला फटका बसला होता.
भारतात कोठे iPhone तयार होतो ?
भारतात iPhone सर्वाधिक असेंबलिंग दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या फॅक्टरीत होत असते. त्याशिवाय विस्ट्रॉनचा भारतातील बिझनेस ताब्यात घेणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आयफोनची असेब्लिंग होत आहे. त्यामुळे भारतातील आयफोनच्या निर्मितीचे प्रमाण वाढत चालले आहे.
निर्यातीचा आधार
आता भारतातील आयफोन मॅन्युफॅक्चरिंग केवळ घरगुती मार्केटपर्यंत मर्यादित राहीलेले नाही. आता हे डिव्हाईसेस जगभरात खासकरुन अमेरिकेत वेगाने पोहचत आहेत. ८ एप्रिल रोजी देशाचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की मार्च २०२५ पर्यंत एप्पलने भारतात सुमारे १.५ ट्रिलियन रुपयांचे iPhones निर्यात केले आहेत.
भारतात Apple ची रुजवात
आता Appleचा फोकस भारतात हळूहळू शिफ्ट होण्याकडे आहे. Apple ला त्यांचे टक्के प्रोडक्शन क्षमता चीन बाहेर आणण्यास ८ वर्षे लागू शकतात. परंतू सुरुवात भारतातून झाली आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची निर्यात अलिकडच्या वर्षांत सरकारच्या प्रोत्साहन ( पीएलआय ) योजनेमुळे वेगाने वाढत आहे. सरकारची ही योजना निर्यातीला प्रोत्साहन देत आहे आणि आयात कमी करीत आहे. कारण आता घरगुती उत्पादन आता घरगुती मागणीच्या ९९ टक्के पूर्तता करीत आहे.