नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
परदेशात जाण्यासाठी महागड्या विमान प्रवासाचा विचार आता मागे पडणार आहे. कारण भारतातून थेट रेल्वेने भूतानमध्ये जाण्याचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. भारत-भूतान संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ४,०३३ कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना सोमवारी मंजुरी दिली.
या प्रकल्पांमुळे दोन्ही देशांतील संपर्क, व्यापार आणि पर्यटनाला नवी गती मिळणार असून प्रवाशांसाठी हा परदेश प्रवास अधिक सोपा आणि परवडणारा ठरणार आहे.
दोन महत्त्वाचे प्रकल्प
1️⃣ कोक्राझार–गेलेफू रेल्वे मार्ग
-
आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफू दरम्यान सुमारे ६९ किमी लांबीचा रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे.
-
यासाठी ३,४५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
-
सध्या पश्चिम बंगालमधील हासिमारा पर्यंत चालणारी रेल्वे यामुळे पुढे गेलेफूपर्यंत धावेल.
2️⃣ बनारहाट–समत्से रेल्वे मार्ग
-
पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से यांदरम्यान २० किमी लांबीचा रेल्वे मार्ग तयार होणार आहे.
-
यासाठी ५७७ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.