spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकृषीपावसाचा जोर, तरीही सात जिल्ह्यांमध्ये पेरणी नाही

पावसाचा जोर, तरीही सात जिल्ह्यांमध्ये पेरणी नाही

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी खरीप हंगामातील पेरणी अजून गती घेताना दिसत नाही. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अद्याप एक टक्काही पेरा झालेला नाही. याशिवाय आणखी सात जिल्ह्यांमध्ये पेरणीचं क्षेत्र पाच हजार हेक्टरच्या पुढे गेलेलं नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

खरीप-२०२५ साठी १४४ लाख हेक्टरचा अंदाज:

चालू वर्षी खरीप हंगामात राज्यभरात सुमारे १४४ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. मात्र १६ जून पर्यंत झालेली पेरणी केवळ ११.७० लाख हेक्टरपर्यंतच पोहोचली असून ही एकूण अपेक्षित क्षेत्राच्या केवळ ९ टक्के इतकी आहे.

मागील वर्षीपेक्षा स्थिती थोडी सुधारलेली:

मात्र, याच आठवड्यात मागील वर्षी (२०२४) पेरणीचं क्षेत्र केवळ ८ लाख हेक्टर इतकं होतं. त्या तुलनेत यंदा ११.७० लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या मते, सध्याची स्थिती चिंताजनक नसली तरीही अद्याप समाधानकारक म्हणता येणार नाही.

पेरणीची गती वाढण्याची शक्यता:

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे जमिनीत वाफसा स्थिती तयार होत आहे. त्यामुळे लवकरच पेरणीला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पेरणीसाठी योग्य वातावरण मिळाल्यास शेतकरी पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर शेतात उतरतील.

सात जिल्ह्यांत पेरणी नाहीच:

ज्या सात जिल्ह्यांत अजून पेरणी सुरू झालेली नाही, तिथे पावसाची कमतरता, पाण्याची टंचाई, किंवा अजूनही वाफसा स्थिती तयार न झाल्याने शेतकरी वाट पाहत आहेत. यामुळे प्रशासन आणि कृषी विभागही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

——————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments