There is a possibility of heavy rain in Kolhapur and Sangli districts.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो ते ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभि ( १५१ मिमी ), पटगाव ( १५० मिमी ), कोडे ( ११७ मिमी ) आणि घटप्रभा ( ११५ मिमी ) धरणांच्या जलाधार भागात तिहेरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. परिणामी वारणार, दूधगंगा आणि राधानगरी धरणांतून अनुक्रमे ४८५२, ४४०० व ८६४० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगे नदीची पातळी वाढू लागली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
साताऱ्यात कोयना धरणाचा विसर्ग
साताऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे तब्बल १८,७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस झाल्याने नद्यांचे प्रवाह वाढले असून खालच्या गावांना प्रशासनाने इशारा दिला आहे.
सांगलीतही ढगाळ वातावरण
सांगली जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहून अधूनमधून पावसाचे जोरदार सरी कोसळल्या. पुढील दोन-तीन दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
प्रशासनाचा इशारा
पावसामुळे नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणांचे विसर्ग सुरू असल्याने नदीपात्राजवळील गावांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरित राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.