spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeहवामानकोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी ; महापुराचा धोका

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी ; महापुराचा धोका

कळंबा तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो; अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कोल्हापूर शहरांसह संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची आणि धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. जून महिन्यामध्येच पाण्याची ही स्थिती निर्माण झाल्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनात पुन्हा एकदा महापुराची भीती निर्माण झाली आहे.

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

मंगळवारी पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून नदीची पाणी पातळी सतत वाढत आहे. आज (बुधवार) सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी ३३ फूट ५ इंचावर पोहोचली आहे. परिणामी, अनेक भागांत पाणी साचले असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

५६ बंधारे पाण्याखाली, पर्यायी मार्गाने वाहतूक

कोल्हापूर जिल्ह्यातील ५६ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मुख्य मार्ग बंद असून पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोदे, जांबरे आणि घटप्रभा हे तीन लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे या परिसरातील नद्या आणि ओढ्यांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राधानगरी धरणात सध्या ६५ टक्के पाणीसाठा झाला असून पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातून ३१०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत आहे. या भागांत डोंगराळ आणि नदीकिनारी भागात पावसाचा जोर अधिक आहे. परिणामी, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कळंबा तलाव जून मध्येच भरला आहे.
कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात संततधार पावसामुळे जलसाठ्यांची स्थिती लक्षणीय बदलली आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव यंदा जून महिन्यामध्येच पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. सामान्यतः हा तलाव ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो होतो. मात्र, यंदा पावसाच्या सुरुवातीलाच तलाव भरल्याने शहरातील जलसंकट दूर होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती सकारात्मक

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणांची सरासरी पाणी पातळी ६० टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यामध्येच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असेच कायम राहिल्यास लवकरच धरणे पूर्ण क्षमतेने भरतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अलमट्टी धरणातून ७० हजार क्युसेकने विसर्ग
दरम्यान, कृष्णा खोऱ्यातील महत्वाचे अलमट्टी धरण सुद्धा भरत असून धरणातून सध्या ७० हजार ४३५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरूच आहे. अलमट्टी धरणाची सध्या पाणी पातळी ५१६.३३ मीटरवर पोहोचली आहे.

महापुराचा संभाव्य धोका कायम

अलमट्टीसह कोल्हापूर जिल्ह्यातील इतर धरणांमधूनही विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, महापुराची धास्ती वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडी आणि संभाव्य उपाययोजना :

  • कोल्हापूर शहर व परिसरातील नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे

  • पाणी साचलेल्या भागांत वाहनांची व व्यक्तींची अनावश्यक वर्दळ टाळावी

  • जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत

  • शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आणि पूरस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असतील. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे.

 हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा – महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढत असून हवामान विभागाने चार जिल्ह्यांसाठी महापुराचा रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर राहणार आहे. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नदीकाठच्या भागांपासून दूर राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

——————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments