पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील नवा ऊस गाळप हंगाम महिनाभरात सुरू होणार असून या हंगामाच्या प्रारंभाचा अंतिम निर्णय येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत होणार आहे. या बैठकीत विशेषतः थकीत रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) या मुद्द्यावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.