शेतकऱ्यांना विद्युत पंपाची मिळणार दिवसा वीज : पालकमंत्री आबिटकर

महावितरण ला दिल्या सूचना

0
209
Paddy cultivation is done on a large scale in Radhanagari talukas. Now, as per the instructions of Guardian Minister Abitkar, electricity will be available during the day for electric pumps.
Google search engine

राधानगरी : प्रतिनिधी

 कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सूचना दिल्यानंतर आता शेतकऱ्यांना भात शेतीसाठी दिवसाची वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.

राधानगरी तालुक्यांमध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते .परंतु दिवसा वीज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली जात होती. महावितरण कडून शेतीपंपाची वीज ही दिवसा चार व रात्रीची तीन दिवस असा नियम होता. परंतु, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तो नियम बंद करून शेतकऱ्यांना सलग दिवस वीज उपलब्ध होणार आहे.

या मागणीसाठी शेतकरी दीपक शेट्टी, नंदकुमार सूर्यवंशी (सरकार), तानाजी चौगुले, राम कदम, उमेश जाधव, विजय डवर, विक्रम पारकर, विलास डवर, संतोष तायशेटे, मंगेश चौगुले यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर व महावितरण कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता लटपटे, उप कार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांचे अभिनंदन केले.

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here