पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ करीता ई-पीक पाहणीची प्रक्रिया दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली होती. महसूल विभागाने विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी मोबाईल अॅप ’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार होते.