spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकृषीशेतकऱ्यांना दिवसा वीज देणार : उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार : उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज फक्त दिवसा मिळणार असून, रात्री वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ही महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘संवाद – उद्योजकांशी’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत आठवड्याचे काही दिवस दिवसा, काही दिवस रात्री वीज दिली जात होती. पण शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका असून, रात्री शेतात जाणं जीवावर बेततं. त्यामुळे आता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वीज दिली जाईल आणि रात्री वीजपुरवठा बंद राहील. यामुळे शेतकरी रात्री घरात सुरक्षित झोपू शकतील.”
राज्यात बिबटे, रानगवे, रानडुकर यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. रात्री वीजपुरवठा असल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी शेतात जावं लागतं आणि त्यामुळे जीवाची जोखीम वाढते.
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments