कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या मिळून २९९७ धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा तब्बल ८६.२०% वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच वेळी हा साठा ७७.३५% इतकाच होता. यंदा सर्व विभागांमध्ये समाधानकारक पाणी असून, अनेक धरणं तुडुंब भरली आहेत.
विभागनिहाय धरणसाठा (४ सप्टेंबर २०२५ पर्यंत )
पश्चिम महाराष्ट्र
-
कोल्हापूर ( राधानगरी ) : ९९.२५%
-
दुधगंगा : ८२.७८%
-
सांगली (वारणा ) : ९६.६८%
-
सातारा ( कोयना ) : ९८.४९%
-
सोलापूर ( उजनी ) : १००%
-
कोकण विभाग : ९२.६५%
-
पुणे विभाग : ९१.७४%
-
नाशिक विभाग : ८०.४६%
-
छत्रपती संभाजीनगर ( मराठवाडा ) विभाग : ८१.३६%
-
अमरावती विभाग : ८५.०२%
-
नागपूर विभाग : ७८.८१%
मराठवाड्यातील धरणं ‘फुल्ल’
गेल्या वर्षी ५१.७७% असणारा मराठवाड्यातील एकूण साठा यंदा ९४.३४% वर गेला आहे.
-
जायकवाडी : ९८.६१% (गेल्या वर्षी ४७.६४%)
-
मांजरा, बीड : ९८.९४% (गेल्या वर्षी ३०.२१%)
-
माजलगाव : ९४.७२% (गेल्या वर्षी १२.२१%)
-
सिद्धेश्वर, येलदरी (हिंगोली) : ९५% पेक्षा जास्त
-
विष्णुपुरी (नांदेड) : ८२.६८%
-
निम्न मनार (नांदेड) : १००%
-
निम्न तेरणा (धाराशिव) : ९८.४७%
-
सीना-कोळेगाव (धाराशिव) : ९९.४५%
-
निम्न दुधना (परभणी) : ७३.३५%
नाशिक व पुणे विभाग
नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणं ९३.१६% भरली आहेत.
-
भंडारदरा, निळवंडे : १००%
-
भाम धरण (नाशिक) : १००%
-
दारणा : ९७.६०%
-
गंगापूर : ९७.९८%
पुणे विभागातील प्रमुख धरणांची स्थिती :
-
निरा देवघर, चाकसमान, भाटघर, टेमघर, मुळशी टाटा, ठोकरवाडी टाटा : १००%
-
पवना : ८७.८९%
-
खडकवासला : ९७.६०%
-
पानशेत : ९९.९६%