spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeकृषीदोन हजार दोनशे १५ कोटींची मदत जाहीर

दोन हजार दोनशे १५ कोटींची मदत जाहीर

मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

महाराष्ट्रात यावर्षी अनेक विभागात अतिवृष्टी झाली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीने ७० लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. शाळा, घराचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य मंत्री मंडळाची सध्या कॅबिनेट बैठक सुरू आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे. पीक नुकसानीसाठी २ हजार, २१५ कोटींची मदत जाहीर झाली आहे. पीक नुकसानीसाठी मदत म्हणून ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मदत व पूनर्वसन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला असून खरीप २०२५ साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

नुकसानीबाबत महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले कि, राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने तडाखा दिला आहे. त्याचा आढावा सरकार सातत्याने घेत होतं. यापूर्वी विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. तर आता विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. यापूर्वीच्या नुकसानीचे आणि आताचे पंचनामे हे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार ३२ लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात झाले आहे.

—————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments