spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeअध्यात्मआधुनिक भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार : पी.व्ही. नरसिंह राव

आधुनिक भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार : पी.व्ही. नरसिंह राव

आज त्यांचा जन्मदिवस.

आधुनिक भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार पी. व्ही. नरसिंह राव (पामुलपर्ती वेंकट नरसिंह राव) हे भारताचे नववे पंतप्रधान होते. त्यांची जडण-घडण ही अत्यंत साधेपणातून, संघर्षातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून झाली. त्यांना १७ भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या विषयीची काही महत्त्वाची माहिती…

नरसिंह राव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी आंध्र प्रदेशातील वांगारा (तेव्हा हैदराबाद राज्यात) या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण (LL.B.) घेतले. भाषेचा त्यांना विशेष रस होता. त्यांना १७ भाषांचे ज्ञान होते — त्यात हिंदी, तेलुगू, मराठी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत, फारसी, फ्रेंच, आणि लॅटिन अशा अनेक भाषा होत्या.

त्यांनी महात्मा गांधींच्या चळवळींमध्ये भाग घेतला. तरुणपणी काहीसा डाव्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. गरिबी आणि शोषितांच्याविषयी त्यांना सहानुभूती होती. दलित, मागासवर्गीय आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती. १९५० च्या दशकात आंध्र प्रदेशात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते १९७१ ते७३ या  काळात मुख्यमंत्री. त्यांनी केंद्र सरकारमध्ये शिक्षण, संरक्षण, परराष्ट्र, आणि गृहमंत्रालय अशा अनेक खात्यांचे त्यांनी जबाबदारीने नेतृत्व केले. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर १९९१ ते १९९६ या काळात ते पंतप्रधान झाले. त्यावेळी  भारत मोठ्या आर्थिक संकटात होता.

आधुनिक भारताचे आर्थिक उदारीकरण सुरू करणारे नेते :

१९९१ मध्ये भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले, तेव्हा नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मनमोहन सिंग यांच्याद्वारे भारतात आर्थिक सुधारणा व उदारीकरणाची सुरुवात झाली. यामुळे भारतात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (LPG policy) यांचा मार्ग मोकळा झाला.

मौन धोरण :

नरसिंह अनेक विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसत. अशा त्यांच्या “मौन” धोरणावर काही वेळा टीकाही झाली. पण ते शांतपणे आणि परिणामकारकपणे निर्णय घेणारे नेते होते. संकटात सुद्धा संयम राखून योग्य निर्णय घेणं ही त्यांची खासियत होती.

अभ्यासू पंतप्रधान:

नरसिंह राव एक अभ्यासू आणि ग्रंथप्रेमी होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यात काही कादंबऱ्याही आहेत. अत्यंत समजूतदारपणा आणि मुत्सद्देगिरीने त्यांनी आंतरराष्ट्रीय व आर्थिक धोरणे हाताळली. राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून संधी देऊन १९९१ पासून आर्थिक सुधारणांची सुरुवात केली.

नरसिंह राव यांचे साहित्य

ग्रंथ स्वरूप वैशिष्ट्ये
The Insider राजकीय कादंबरी राजकीय, भ्रष्टाचारावर निर्भीड भाष्य
Ayodhya 6 Dec 1992 आत्मकथनात्मक तांत्रिक लेखन बाबरी विध्वंसाच्या संदर्भातील प्रत्यक्ष अनुभव
Selected Speeches भाषण संकलन धोरणात्मक विचार, राजकीय प्रवचनांची समज
सहाय्यक ग्रंथ बायोग्राफी, अभ्यास रावांच्या योगदानांचा विश्लेषण

पी. व्ही. नरसिंह राव यांची जडण-घडण ही एका सामान्य ग्रामीण भागातील ब्राह्मण कुटुंबात झाली, परंतु त्यांचे शिक्षण, वैचारिक प्रगल्भता, स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, आणि प्रशासनातील अनुभव यामुळे ते एक दूरदृष्टी असलेले, शांत, आणि परिपक्व नेते म्हणून घडले. त्यांच्या नेतृत्वात भारताने एक नवीन आर्थिक दिशा स्वीकारली, जी आजच्या भारताच्या विकासाचा पाया बनली.

—————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments