मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे गंभीर संकटातून जात आहेत. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे अंदाजे ६० लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पिके पाण्यात गेले आहेत.