कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शारदीय नवरात्रौत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण ललिता पंचमी सोहळ्यानिमित्त आज (शनिवार, दि. २७) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात त्र्यंबोलीकडे मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्याचा मुख्य आकर्षण असलेला नवरात्र प्रतीक ‘कुष्मांड’ (कोहळा) भेदन विधी टेंबलाई टेकडीवर पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता अंबाबाईची पालखी त्र्यंबोली मंदिराकडे निघाली असून मार्गावर पायघड्या घालून भक्तांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
