नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( २४ सप्टेंबर ) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या बैठकीत देशातील जहाज बांधणी आणि सागरी उद्योगाला चालना देण्यासाठी तब्बल ₹६९,७२५ कोटींच्या महाकाय पॅकेजला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे भारताला जागतिक जहाजबांधणी बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान मिळविण्यास मदत होणार असून रोजगार निर्मितीलाही मोठा वाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.