छत्रपती शिवाजी महाराजच आत्मनिर्भरतेचे प्रणेते: सरसंघचालक मोहन भागवत

0
222
File written by Adobe Photoshop? 5.0
Google search engine

प्रत्येक बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा हे सूत्र त्यांनी देशाला दिले त्यांच्या कल्पना त्यांनी अस्तित्वात आणल्या मात्र आपण अद्यापही अनेक कल्पना लागू करू शकलो नाही असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन गुण तरी अंगी बाळगले पाहिजेत. या युगाचे आदर्श पुरूष म्हणून त्यांचे निदान अनुकरण तरी करावे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवल तत्कालीनच नव्हे तर भविष्यातील भारताला देखील दिशा दिली त्यांच्या राज्याभिषेकानंतर अनेकांची सद्दी संपली. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रवादीची संकल्पना स्पष्ट होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी शिवचरित्र कीर्तनकार समाजात पाहिजेत कीर्तनातून सामाजिक बदल होतात ही भोळी श्रद्धा नसून ते एक सामाजिक तंत्र आहे. संघाचे काम तत्ववादी असून त्यात व्यक्तीवादास जागा नाही. संघात साकार व्यक्तीमत्वात दोनच व्यक्तीमत्व मानली जातात ते म्हणजे हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज.

सरसंघचालक मोहन भागवत दिवंगत डॉक्टर सुमंत दत्ता टेकाळे यांच्या ‘युगंधर शिवराय” या पुस्तकाचे प्रकाशन वेळी बोलत होते. त्या वेळी मुधोजीराजे भोसले, पुस्तकाचे संपादक डॉक्टर श्याम माधव धोंड व प्रकाशक सचिन उपाध्याय उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here