विस्मरणात गेलेली ‘आरके’स्टुडिओतली ‘होली’ व राजसाब यांच्या वारसदारांच्या आठवणी!

0
217
Google search engine

रणधीर कपूर त्यावेळच्या आर के स्टुडिओ तील होली विषयी म्हणाला ‘आधी पारंपरिक स्वरूपात होली खूप जोशात आणि मजेत साजरी व्हायची. फार जबरदस्त वातावरण असायचे पण जसे कृत्रिम रंग वापारण्याचे फॅड आले तेव्हा पासून सर्व वातावरण बदलू लागले. या रंगामुळे केस व नखे खराब होत असल्याने हिरोईन्स येईनाशा झाल्या. नवीन पिढीतील हिरॉईन्सनी पाठ फिरवल्यावर मला व ऋषिलाही उत्साह राहीला नाही . पहिली मजा राहिली नाही. निळे पिवळे झालेले चेहरे कोणाचे आहेत ही नंतर ओळखू देखील येत नव्हते. अनोळखी लोक येऊन नंतर याचा गैरफायदा घेऊ लागले. माॅब वाढू लागल्याने नियंत्रणात राहत नव्हता’.

कपूर घराण्यातील तिसऱ्या पिढीचा नायक रणबीर कपूर निर्माता दिग्दर्शक राहुल रवेलशी बोलताना म्हणाला ‘मी त्यावेळी खूप लहान होतो. मी भ्यायचो कारण काळा व इतर रंग फासलेली माणसे भीतीदायक वाटायची. सर्वाना ट्रक मध्ये कोंबायचे. तुमच्याकडेच याच्या चांगल्या आठवणी असतील.’ राहुल रवेल म्हणाले ‘बरोबर आहे. सर्वजण अनेक रंगात न्हाऊन निघायचे. खरोखर दिवस साजरा व्हायचा.’ आख्या फिल्म इंडस्ट्रीत आरकेचीच होळी साजरी व्हायची. कपुरांच दिलखुलास पंजाबी ‘दिल’ मुंबईच्या मुक्त ‘काॅस्मोपाॅलिटन’ वातावरणात ओसंडून वहायच! आणि त्याची लागण सर्वांनाच झालेली असायची.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here