होळीची अनोखी परंपरा: मसान होली.

0
193
Google search engine
  • मसान होळीचे महत्त्व:
  • मृत्यूवरील विजय: मसान होळी मृत्यूवरील विजयाचे प्रतीक मानली जाते. हिंदू धर्मात मानवी शरीर मृत्यूनंतर जाळल्यावर उरते ती अस्तित्वाची राख. अस्तित्वात असलेले जिवंत जन ही राख एकमेकावर उधळतात,एकमेकास लावतात. आपल्या शरीराचेही एक दिवस याच राखेत रूपांतर होणार आहे याची तमा न बाळगता जिवंतपणाचा उत्सव साजरा करायचा तो मृत्यूचे भय उधळून टाकून!
  • भगवान शिव आणि मृत्यू: या होळीचा संबंध भगवान शिव यांच्याशी जोडला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने मृत्युदेव यमराजाला पराभूत केल्यानंतर स्मशानातील राखेने होळी खेळली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. भगवान शिव हे तर भस्मार्चित. नश्वर देहाचा मोह त्यागून राख देहास फासून राख व देह वेगळा नाही सांगणारे,वैरागी होऊन ध्यानात मनात उतरून आत्मसाक्षात्कार करा सांगणारे!
  • आध्यात्मिक महत्त्व: मसान होळी केवळ एक सण नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे. ही होळी माणसाला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होऊन जीवन जगण्याचा संदेश देते.
  • जीवन आणि मृत्यूचे सत्य: ही होळी जीवन आणि मृत्यू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे दर्शवते.

  • मसान होळी साजरी करण्याची पद्धत:
  • होळीच्या दुसऱ्या दिवशी, स्मशानभूमीतील चितांच्या राखेने होळी खेळली जाते.
  • या दिवशी, लोक पारंपरिक गाणी गातात आणि नृत्य करतात, परंतु रंगांऐवजी राख वापरली जाते.
  • या होळीत, लोक मृत्यूच्या भयापासून मुक्त होऊन आनंदाने सहभागी होतात.
    मसान होळीचे वैशिष्ट्य:
  • ही होळी रंगांऐवजी राखेने खेळली जाते, ज्यामुळे तिला वेगळे स्वरूप प्राप्त होते.
  • या होळीत, मृत्यूच्या भयावर मात करण्याचा संदेश दिला जातो.
  • ही होळी आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते.
    मसान होळी एक अनोखी आणि आध्यात्मिक परंपरा आहे, जी जीवन आणि मृत्यूच्या सत्याची जाणीव करून देते. पुर्वी केवळ नागा साधू, हटयोगी, नाथपंथीय बैरागी वाराणशीत उतरून घाटावर जळलेल्या, जळणा-या चितातील राख मनसोक्त खेळायचे. हर हर महादेव च्या गजरात जिवंत ईशभक्तीचा जोश थंड झालेल्या राखेतून उभारायचा. आता अगदी परदेशी देखिल येउन,सहभागी होउन या जन्म मृत्यूच्या खेळात दंग होऊन जातात.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here